ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात मागील चोवीस तासात 10 हजार 320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 22 हजार 118 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 265 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एका दिवसात 10 हजार 333 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 32 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यात 1 लाख 50 हजार 662 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 14 हजार 994 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.68 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3.55 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 8 लाख 99 हजार 557 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 39 हजार 535 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.