प्रतिनिधी/ बेळगाव
भाषिक प्रांतरचना करताना सीमावासियांना अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले. त्या विरूद्ध मागील 60 वर्षांपासून लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळला जातो. त्यामुळे यावषीही काळादिन पाळून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करावी, असा ठराव शहापूर विभाग समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.
शुक्रवारी गोवावेस रामलिंगवाडी येथील सिद्धीविनायक मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळय़ादिनासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रारंभी सर्व दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अनगोळ शिवारात जमीन संपादनाचा प्रयत्न करणाऱया बुडा अधिकाऱयांच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडण्यात आला.
यावेळी शिवाजी हावळाण्णाचे, राजकुमार बोकडे, शुभम शेळके, शिवाजी मजूकर, राजू पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अभिजित मजूकर, भूषण बोकडे, राकेश सावंत, सुनील बोकडे, संदेशन डवरी, विनायक पवार, रंजन बोकडे, मनोज बिर्जे, कपिल बिर्जे, धनंजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..