ऑनलाइन टीम / मुंबई :
देशातल्या तरूणांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. तसेच देशातील तरूणांना विश्वासात घेणं गरजेच आहे. तसेच हल्ल्यामागचा खरा चेहरा समोर येणं गरजेचं आहे. जेएनयू मधील हल्ला भ्याड व निंदनीय आहे. असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, जेएनयू सारख महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाराष्ट्रातल्या तरूणांना सांगू इच्छितो, आपण महाराष्ट्रात सुरक्षित आहात, काळजी करू नका, आपल्या केसालाही धक्का बसणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
या हल्ल्यातून 26।11 च्या हल्ल्याची आठवण झाली. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.