ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे निर्बंध कडक करावे लागतील. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दोन दिवसात यासंदर्भात निर्णय होऊ शकतो, असे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या 11492 कोरोना रुग्ण आहेत. 20 जानेवारी 2021 दरम्यान, पाच ते सहा हजार असणारा आकडा आज तब्बल 11 हजारांवर पोहोचला असून, तो 20 हजारांवर जाऊ शकतो. मुंबईत बाधित होण्याचे प्रमाण 4 टक्के आहे. 20 जानेवारी रोजी मुंबईत दिवसाला 300 रुग्ण आढळून येत होते. आज मुंबईत 1300 रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दोन दिवसांत राज्यातील निर्बंध वाढविण्यावर निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.