ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजेच 14,888 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 18 हजार 711 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 295 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 7,637 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 5 लाख 22 हजार 427 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.69 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 1 लाख 72 हजार 873 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 23 हजार 089 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.21 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 12 लाख 68 हजार 924 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 33 हजार 644 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.