ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. असे असले तरी दैनंदिन मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. मागील 24 तासात 11 हजार 152 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 20 हजार 852 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला. कालच्या दिवशी 289 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनामुळे 98 हजार 771 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
महाराष्ट्रात सद्य स्थितीत 1 लाख 96 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत एकूण 55,07,058 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86 % इतके आहे. तर मत्यूदर 1.7% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,60,31,395 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 58,05,565 (16.11 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.