- गुरुवारी 850 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रासमोर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यातील दैनंदिन रुग्ण संख्येत घट होत असली तरी मृत्यूंची वाढत असलेली संख्या धडकी भीतीदायक आहे. दरम्यान, मागील 24 तासात राज्यात कोरोनामुळे 850 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 78,857 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवशी 42 हजार 582 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 54 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 52 लाख 69 हजार 292 वर पोहोचली आहे. त्यातील 42,54,731 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.34 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 33 हजार 294 रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबई : रुग्णांचा एकूण आकडा 6,84,048 वर
मुंबईतून दिलासादायक बाब समोर आली आहे. कालच्या दिवसात 2037 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 1946 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत 6,29,410 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी 68 जणांचा मृत्यू झाला. तर मृतांची एकूण संख्या 14,076 इतकी आहे. सद्य स्थितीत 38 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.