- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 %
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात तब्बल 52,898 जणांनी कोरोनावर मात केली. तर 28,438 नव्या रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवशी 679 जणांनी आपला जीव गमावला आहे. सोमवारी ही संख्या 516 इतकी होती.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 54 लाख 33 हजार 506 वर पोहचली आहे. यातील 49 लाख 27 हजार 480 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 83 हजार 777 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.54 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 4 लाख 19 हजार 727 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 15 लाख 88 हजार 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 33 हजार 506 (17. 2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30 लाख 97 हजार 161 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 25 हजार 004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- मुंबईत काल 953 नव्या रुग्णांची नोंद
मुंबईतून दिलासादायक बाब समोर आली आहे. कालच्या दिवसात 2,258 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,90,889 पोहचली असून त्यातील 6,41,598 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी 44 जणांचा मृत्यू झाला. तर मृतांची एकूण संख्या 14,352 इतकी आहे. सद्य स्थितीत 32 हजार 925 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.