ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांपैकी दहा हजार नव्हे तर तब्बल 12 हजार 538 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करून डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील 12 हजार 538 विविध पदांच्या जागा तातडीने भरण्यासाठी प्रक्रिया तातडीने चालू करून सदरील भरती प्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.