प्रतिनिधी/मुंबई
राज्यात सध्या लसीचे 14 लाख डोस उपलब्ध आहेत. हा तीन दिवस पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतर लसीकरण ठप्प होईल. दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा केला तरच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल. केंद्राकडून लस पाठवली जाते, पण गती कमी आहे. सांगितल्याप्रमाणे पुरवठा होत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनाचे वाढते रुग्ण, त्यावरील उपाययोजना आणि लसीकरण याबाबत राजेश टोपे यांना पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी लस नाही. अनेक जिह्यांत लस नाही म्हणून केंद्रे बंद करावी लागत आहेत. आम्ही पेंद्राच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. दररोज 3 लाख लसीकरण करत होतो ते आता 6 लाख करा असे सांगितले जात आहे. सद्यस्थितीत आम्ही साडेचार लाखापर्यंत पोहचलो. पण लस नाही म्हणून काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. लस नाही म्हणून अनेक केंद्रांवरून लोकांना परत पाठवत आहोत. त्यामुळे लसीचा पुरवठा करा, अशी मागणी केंद्राकडे सातत्याने करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाटÎाने वाढत आहेत. आम्ही लसीकरणासाठी गावागावात टीम पाठवत आहोत. तशी यंत्रणा उभी केली आहे. पण आम्हाला लस मिळत नाही. लवकरात लस पाठवण्याची पेंद्राला कळकळीची विनंती केली. सुमारे 20 ते 40 वयोगटातील लोक जास्त फिरतात, त्यामुळे ते जास्त कोरोनाग्रस्त झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे अठरा वर्षाच्या पुढे सर्वांचे लसीकरण करायची मागणी केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाटÎाने वाढत असल्याने इथे आधी लस द्या, असेही राजेश टोपेंनी सांगितले.
राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यातील 700 मेट्रिक टन लागतो. सध्या ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करा, अशी मागणी केली आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.
महाराष्ट्राला दर दिवसाला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने या सर्वांचा वापर होत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. त्याशिवाय सर्व खाजगी डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर हा टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार करा, असा सल्लाही राजेश टोपेंनी दिला आहे
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यासाठी प्रभावी पडत असलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी मेडिकल दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
रेमडेसिव्हीरमध्ये नफेखोरी नको
काही ठिकाणी रेमडेसिव्हीरचा भाव 3 ते 4 हजार रुपये केला जात आहे. ते इंजेक्शन 1100 ते 1400 च्या वर विकू नका, असे ठरवले होते. पण त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे ती रेमडेसिव्हीर इंजेक्शनची योग्य ती किंमत ठरवेल. त्याचे उल्लंघन करणार्योवर कडक कारवाई केली जाईल, असे टोपे म्हणाले.
केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याबरोबर देशातील 9 राज्यांच्या आरोग्यमंर्त्यांची व्हिडियो कॉन्फरन्स झाली. त्यावेळी केंद्र सरकारच्या नियमावलींचे तंतोतंत पालन करणारे महाराष्ट्र अग्रभागी असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक व्यापार्यांचा विरोध पत्करुन आम्ही कोरोना रोखण्यासाठी जे जे करायचे ते केले आहे. केंद्राच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या आहेत. पण केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.
लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे अर्थचक्राला धक्का बसल्याने राज्यभरातून अनेक घटक सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले, की दुकाने बंद आहेत हे मान्य आहे, पण जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार करू. निर्बंध कडक केले आहेत, लॉकडाऊन केलेलं नाही, असे स्पष्टीकरण टोपे यांनी दिले.