ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉक डाऊन 14 एप्रिलला संपत आहे. त्यानंतर लॉक डाऊन वाढवणार की उठवला जाणार याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉग डाऊन वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता 30 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन वाढवला जाऊ शकतो.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, केंद्र सरकारकडे मदत देण्याची मागणी केली आहे.लॉक डाऊन वाढवण्यामागे महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हाच मुख्य हेतू आहे. त्यामुळे आता लॉक डाऊन वाढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या हजारच्या वर पोहचली आहे. त्यामुळे लॉक डाऊन वाढवण्याची शक्यता अधिक आहे. ओडिशा आणि पंजाब राज्याने 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर करून टाकला आहे.