ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात आतापर्यंत 29 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या राज्यात 36 हजार 031 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 67 हजार 655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 44 शासकीय आणि 34 खाजगी अशा 78 प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष 3585 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2752 एवढे आहे. राज्यात 5 लाख 58 हजार 100 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 704 खाटा उपलब्ध असून सध्या 34 हजार 480 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11.7 दिवस होता तो आता 17.5 दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 15.7 दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.35 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे. राज्यात काल 89 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यामध्ये मुंबई 52, ठाणे 5, नवी मुंबई 9, कल्याण- डोंबिवली 4), नाशिक- 6 (मालेगाव 6), पुणे 9, सोलापूर 2, लातूर-1 आणि यवतमाळमधील 1 या रुग्णांचा समावेश आहे.