मुंबई/प्रतिनिधी
राज्यात एकीकडे दिवसेंदिवस करोना रुग्णवाढीचे सत्र सुरु असताना, दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने देखील गती घेतल्याचे दिसत आहे. सोमवारी राज्याने पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर, आजच्या लसीकरणामुळे आता महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, असं टोपेंनी सांगितलं आहे.
“महाराष्ट्राने आज(मंगळवार) पर्यंत दीड कोटी लसीकरण टप्पा पूर्ण केला असून, एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. सोमवारी दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली.” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटकरत म्हंटल आहे.