ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोना चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
देशात वाढत चाललेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. लॉक डाऊन चा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. राज्याचे उत्पन्न देखील जवळपास थांबले असून राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे, याकडे लक्ष केंद्राचे लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राला पत्र पाठवले आहे.
केंद्राकडे महाराष्ट्राची 16 हजार 654 कोटी रुपयांची थकबाकी आहे. येत्या 31 मार्च पर्यंत ही थकबाकी मिळावी तसेच या संकटाचा मुकाबला करण्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्रासाठी मंजूर करावे या संदर्भातील पत्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन, राज्याचे केंद्रातील मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना पाठवले आहे.
दरम्यान, सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली असून आतापर्यंत १० जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.