कोकणात प्रवास सुसाट : दोन्ही राज्यांतील प्रवाशांना दिलासा, महाराष्ट्र बससेवा दीड वर्षापासून होती ठप्प
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून यंदे खूटपर्यंत धावणारी महाराष्ट्राची एसटी आता बेळगाव बसस्थानकात दाखल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह सीमाहद्दीतील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र महाराष्ट्राच्या बस बेळगाव शहराबाहेर थांबत होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणी जाऊन प्रवास करावा लागत होता. मात्र आता महाराष्ट्राच्या एसटीने थेट बेळगावच्या बसस्थानकात प्रवेश केला आहे. त्यामुळे बसस्थानकातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱया प्रवाशांना सोयिस्कर झाले आहे.
कोरोनाच्या उदेकामुळे कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा दीड वर्षापासून ठप्प झाली होती. मागील काही दिवसांपासून कर्नाटकाच्या बस महाराष्ट्राच्या विविध भागात धावत होत्या. मात्र महाराष्ट्रात कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने महाराष्ट्राच्या एसटीने कर्नाटकात एन्ट्री केली नव्हती. मात्र आता काही कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकाच्या विविध भागात धावताना दिसत आहे.
कोकणातील कणकवली, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आगारातून बस बेळगावात दाखल होत आहेत. त्यामुळे कोकणासह चंदगड तालुक्मयातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
विशेषतः बेळगाव-कोकण प्रवास सोयिस्कर झाला आहे. मागील काही दिवसात बससेवा ठप्प झाल्याने कोकणात प्रवास करणे कठीण झाले होते. प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. परिणामी गाडय़ा बदलत इच्छितस्थळी पोहोचताना कष्ट घ्यावे लागत होते. मात्र आता कर्नाटक आणि महाराष्ट्राची एसटीदेखील सुरळीत सुरू झाल्याने कोकण प्रवास सोयिस्कर झाला आहे.
प्रवासाचा प्रश्न मार्गी
मागील काही महिन्यांपासून ठप्प झालेल्या बेळगाव-कोकण बससेवेला सुरळीत सुरुवात झाली आहे. कोकणातील विविध भागात कर्नाटकाच्या बस धावत आहेत. तर कोकणाच्या सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली आगारातील बसही कर्नाटकात सुसाट धावत आहेत. त्यामुळे कोकण-बेळगाव प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.