प्रतिनिधी / मुंबई, कोगनोळी, पुणे
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकने तेथे `अर्लट’ जारी केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कर्नाटकचे प्रवेशद्वार असलेल्या कोगनोळी टोलनाक्यावर `कोरोना नाकाबंदी’ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱया सर्व प्रवाशांची तपासणी करुनच प्रवेश दिला जाणार असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. टोलनाका परिसरात तहसीलदार कार्यालय विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने कर्मचारी तसेच आशा कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाटÎाने वाढ होत आहे. गत 24 तासात 6112 नवे करोनाबाधित वाढले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारातील रुग्णांची संख्या 44 हजार 765 आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार लॉकडाऊन करण्याबाबत विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबाबत रुग्णसंख्या, प्रसार पाहून स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
महामार्गावरील कोगनोळी येथे कर्नाटक हद्दीत कर्नाटक सरकारच्यावतीने आरोग्य तपासणी यंत्रणा उभारण्यात आली असून सर्व चारचाकी खासगी व अन्य वाहनांमधून येणाऱया प्रवाशांची तपासणी करुनच त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कोणाला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास त्यांना परत पाठवण्यात येणार असल्याचेही तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या डिस्चार्ज मिळणाऱयांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणे चिंतेची बाब आहे.अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा दिली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण, उपाय योजना याकरता रविवारी सचिवस्तरावरील अधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपाय योजनांबाबत निर्णय घेण्यात येतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व अधिकाऱयांशी संपर्क साधून बैठक घेतली आहे. त्यांनीही त्यावेळी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, 1 फेब्रुवारीपासून काही शहरं, जिह्यांमध्ये पॉझिटिव्हची संख्या डिस्चार्जच्या तुलनेत वाढत असून ते धोक्याचे आणि काळजीचे आहे, नागरिकांनी खबरदारी घेतली नाहीतर संचारबंदी, नाईट कर्फ्यू अथवा लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे.
शाळा, परीक्षांबाबत पुढील आठवड्या त निर्णयः विजय वडेट्टीवार
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे शाळा सुरु ठेवाव्यात की नाही, दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यावी याबद्दल वेगवेगळी मते मांडली जात आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवडÎात बैठक होणार आहे, अशी माहिती मदत व पुर्नसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर स्प्रेडर वाढू नयेत म्हणून सायंकाळी 6 ते पहाटे सहापर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.