पुणे / प्रतिनिधी :
प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गतविजेत्या बाला रफिक शेख व अभिजित कटकेचे आव्हान संपुष्टात आल्याने यंदा मानाची गदा उंचावण्याचा मान नव्या मल्लवीराला मिळणार आहे.
अभिजित कटके व बाला शेख हे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांचाच पराभव झाला. त्यामुळे यंदा नवा विजेता मिळणार, हे निश्चित आहे.
लातूरचा शैलेश शेळके व नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे कोण गदा पटकावणार, याबाबत औत्सुक्य आहे.