तरुणभारत ऑनलाइन टीम
कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला हरवून महाराष्ट्र केसरी किताबा आपल्या नावे केला मात्र या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने बोलून दाखवली.
अवघ्या १९ वर्ष वयाच्या पृथ्वीराजने कोल्हापुरचं नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले. पण त्याला बक्षीसच न दिल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. साता-यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे सध्या बोलले जातय. या प्रकारावर जागतीक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने याने सुद्धा आवाज उठवलाय. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातुन येतात यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.यावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस देणे गरजेचे आहे, जर हे दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही याची माहिती घेतली जाईल, मल्ल प्रचंड मेहनतीने हा किताब मिळवतात बक्षीसच देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिलं जाईल आणि जर ही जबाबदारी आयोजकांची असेल तर आयोजकांना सुचना दिल्या जातील. मात्र बक्षीसच न देणे ही मोठी चुक असल्याचं असं ते म्हणले आहेत.