केंद्र सरकारच्या आदेशाला राज्य सरकार जुमानत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
पेडणे ( प्रतिनिधी )
केंद्र सरकारने 1 सप्टेंबर पासून आंतरराज्य सीमा खुल्या करण्याच्या निर्णयाचे सर्वत्र सीमा भागातील नागरिकांनी स्वागत केले आहे.माञ केंद्र सरकारच्या आदेशाच्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी यंञणेला आदेश न आल्यने सातार्डा , आरोंदा व केरी – तेरेखोल या गेटी व चेक नाके खुले न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, रात्री उशिरा सातार्डावासियांनी गेटीची नासधूस केल्याचा प्रकार घडला आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार गोवा राज्यातील सर्व सीमा चेकनाके गोवा सरकारने 1 सप्टेंबर पासून पहाटेच सुरु केले. पञादेवी येथे राष्ट्रीय मार्गावर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असलेली गेट खुली केली. मात्र महाराष्ट्र सरकारने आपल्या राष्ट्रीय माहामार्ग वगळता असलेल्या सातार्डा तसेच किरणपाणी येथील आरोंदा भागातील सीमा खुली केली नसल्याने सिंधुदुर्ग भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या कृतीचा निषेध केला.
सकाळी भाजपा स्थानिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र भागात सीमा खुल्या करण्यासाठी सातार्डा चेक नाक्मयावरील पोलिस अधिकाऱयावर दबाव आणून गोवा राज्याने आपल्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत . त्यामुळे सिधुदुर्गातील सर्व सीमा खुल्या कराव्यात या मागणीसाठी स्थानिकांनी सकाळपासून आंदोलन सुरु केले . त्याना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला . आंदोलन चिघळू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या जिल्हाधिकाऱयांकडे चर्चा करून व सरकारचे परिपत्रक आल्यावर लगेच सीमा खुले करण्याचे आश्वासन पोलिसांनी आंदोलन कार्त्याना दिले .
22 मार्च पासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात पेडणे तालुक्मयातील महत्वाच्या पत्रादेवी ा बांदा , नईबाग ा सातार्डा , किरणपाणी – आरोंदा ,आणि तेरेखोल- रेडी या सीमा कडक पोलीस बंदोबस्तात आजपर्यंत बंद होत्या .केवळ राष्ट्रीय माहामार्ग 65 वरील पत्रादेवी हा चेक नाका सरकारच्या लॉकडाऊन नियमनानुसार कडक तापासणी करून वाहनाना प्रवेश दिला जात होता .
पाच महिन्या नंतर राज्यातील तसेच पेडणे तालुक्मयातील सर्व सीमा गोवा सरकारने केंद्र सरकारच्या आदेशानुसार खुल्या करण्यात आल्या. मात्र पलीकडून महाराष्ट्र सरकारने आपल्या सीमा मात्र खुल्या केल्या नाहीत . या सीमा खुल्या कराव्यात या साठी सातार्डा पुलाच्या जवळ असलेले चेक नाक्मयावर बांदा भाजपा मंडळ महेश धुरी , जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब , उप तालुकाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ , भाजपा बांदा युवक सचिव अजीत कवठणकर , सदस्य प्रीतेश आरोंदेकर , किनले उपसरपंच वैभव सोपटे , सामाजिक कार्यकर्ते अरुण केरकर , सागर प्रभू , राजन कवठणकर , शेखर केरकर व सातार्डा भागातील स्थानिकांनी चेक नाके खुले करण्यासाठी दोन तास आंदोलन केले . महाराष्ट्र पोलिसांनी यावेळीच हस्तक्षेप करून आंदोलन उधळून लावले . जोपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून लेखी परिपत्रक येत नाही तोपर्यंत सीमा खुल्या केल्या जाणार नाही . अशी भूमिका पोलिसांनी सुरुवातीला घेतली मात्र आंदोलन कर्त्यांनी जर चेकनाके मोकळे केले नाहीतर हजारोंच्या संखेने उपस्थिती लावून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला . हळू हळू पंचक्रोशीतील नागरीक सातार्डा पुलावर जमा होवू लागले . भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱयांकडे चर्चा करून आंदोलन तीव्र करण्यापूर्वी तोडगा काढावा अशी मागणी केली . पोलीसानीही आंदोलन कर्त्यांची समजून काढत सरकारचे परिपत्रक आल्यावर नाके खुले करण्याचे आश्वासन दिले .
1 पासून गोवा सरकारने आपल्या सर्व सीमा खुल्या केल्या ,मात्र सिधुदुर्ग भागातील आज सीमा सर्व बंद होत्या सातार्डा पूल , किरणपाणी पुलावर गोवा सरकारने घातलेले आपले अडथळे हटवले होते . मात्र महाराष्ट्र भागातील राष्ट्रीय महामार्ग सीमा खुल्या केल्या नव्हत्या . सातार्डा मार्गे गोव्यातून जी वाहने महाराष्ट्रात जात होती ती वाहने तिथे अडवण्यात आली .त्या भागातील नागरिकांनी चेक नाक्मयावर आंदोलन सुरु करून चेक नाके खुले करण्याची जोरदार मागणी केली .
लॉक डाऊन काळात अनेकाना आर्थिक फटका बसला , अनेकाना नोकऱया गमवाव्या लागल्यात .सिंधुदुर्गाततील अनेक नागरिक कामगार वाग राज्यात कामाला आहे काहीजण गोव्यात अडकून पडले तर काही जणांना आपल्या गावात नोकरीविना घरात बसून राहावे लागले . सर्व प्रकारच्या व्यवहारावर विपरीत परिणाम होवून सर्व सामान्य नागीरीकाना त्याचा फटका बसला . याची सिंधुदुर्ग भागातील नागरिकांनी रस्त्यावर येवून जशा सीमा गोवा सरकारने खुल्या केल्या त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने खुल्या करण्याची जोरदार मागणी केली .