मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
अकोला, अमरावती, यवतमाळ जिह्यातील कोरोना स्थितीचा आढावा
प्रतिनिधी / मुंबई
राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने यासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले आहेत. त्याल्ल् त्या ठिकाणची परिस्थिती पाहून संबंधित स्थानिक प्रशासनाने लॉकडाउन करायचे की नाही याचाही निर्णय घ्यावा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली. त्यामुळे राज्यात सरसकट लॉकडाऊन होणार नसला तरी ज्या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे तेथे लॉकडाउन होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बैठक घेतली. या बैठकीत अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या तिन्ही जिह्यांत करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे या तीन जिल्ह्यात कठोर पावले उचलण्याच्या सूचना मुख्यमंर्त्यांनी संबंधित जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. त्यानुसार विदर्भातील अमरावती तसेच यवतमाळ जिह्यात तातडीने लॉकडाऊन लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही समजते.
याबाबत अधिक माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने कडक नियम लागू करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत मुख्यमंर्त्यांनी सर्व संबंधितांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. सद्य स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही मुख्यमंर्त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिलेला आहे.