प्रतिनिधी / नागपूर
तीन वर्षांपासून खोळंबलेल्या पोलीस भरतीला अखेर गफहमंत्री अनिल देशमुख यांनी पुर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागा भरणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. या भरतीतील 5,300 जणांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित जागा पुढील टप्पात भरल्या जातील. 12,500 पोलीस भरती करूनही गरज भासल्यास आणखी भरती करू असेही देशमुख म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गफहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.याबाबत माहिती देताना देशमुख म्हणाले की, सुरुवातीला 12500 जागा भरल्या जाणार आहे आणि गरज पडल्यास येत्या 4 महिन्यात 20,000 जागा भरल्या जाणार, असे आश्वासन गफहमंर्त्यांनी दिल्याचे ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
तर, पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. गेल्या काही दिवसांपुर्वीच ठाकरे सरकारकडून एसईबीसीच्या आरक्षणाशिवाय पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे तत्कालीन पोलीस भरती वादाच्या भोवर्यात सापडली होती. मात्र पुन्हा एकदा गफहमंर्त्याने पोलीस भरतीची घोषणा केल्याने, आता मराठा संघटना कोणती भूमिका घेतात. हे पाहणे औच्युक्याचं ठरणार आहे.