ऑनलाईन टीम / बीड :
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील बीड जिल्ह्यात लॉकडाऊनची तारीख संपायला आलेली मात्र तरीही कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी न झाल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने 4 मे रोजी 3 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. या काळात जर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, असेे बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले होते. मात्र रूग्णसंख्येत घट झाली नसल्याने जगताप यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.
रविंद्र जगताप म्हणाले की, रुग्णसंख्येत घट न झाल्यामुळे जिल्ह्यात आता 12 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. तसेच या काळात दररोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत फेरीवाल्यांना तसेच भाजीपला विक्री करण्यास करण्यास परवानगी असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.