पालकमंत्री सतेज पाटील यांचा भाजपवर आरोप, सोमेय्यांनी जिह्याची शांतता भंग करु नये
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप भाजपाने चालविला आहे. पक्ष म्हणून त्यांनी घेतलेली ही भूमिका दुर्देवी आहे, असा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच भाजप नेते किरीट सोमेय्या यांनी जिह्यातील शांतता भंग करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी किरीट सोमेय्यांकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत विचारणा केली असता, पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारमध्ये खा. नारायर राणे हे मंत्री झाले, त्यावेळीच महाविकास आघाडीचे सरकार आणखीन भक्कम झाले. यातील एकही पक्ष आपल्याबरोबर येणार नाही हे लक्षात आल्यावरच भाजपने हे सरकार अस्थिर करण्याचा खटाटोप सुरु केला. ही सर्व प्रकरणे आताच का निघत आहेत? गेल्या पाच वर्षात भाजपाचेच सरकार होते. जर एखाद्या माणसाने चूक केली असेल तर त्यावेळी तुम्ही का गफ्प बसला? ज्या प्रमाणे गुन्हा न सांगणे हा गुन्हा आहे, त्याचप्रमाणे गुन्हा लपविणे हा देखिल गुन्हाच आहे.
ते पुढे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. सोमेय्यांच्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देऊ. त्यांनी एखाद्या तपास यंत्रणेकडे तक्रार दिली असेल तर त्या यंत्रणेवर विश्वास ठेवावा. कायदेशीररीत्या काय व्हायचे होईल. ती यंत्रणा येथे येऊन माहिती घेऊन चौकशी करेल. परंतु तक्रारदार असलेल्या सोमेय्यांनी सर्वत्र फिरत बसण्याची गरजच काय? त्यांच्या अशा गोष्टींमुळे जिह्यातील शांतता भंग होऊ शकते. कृपया त्यांनी जिह्यातील शांततेचा भंग करु नये.
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळेच जिह्यात बंदी आदेश
सोमेय्यांना कोल्हापूर जिल्हा बंदी बाबत पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना विचारले. यावर पालकमंत्री म्हणाले, जिह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठीच 144 कलम लागू करुन बंदी आदेश दिला जातो. त्यानुसार सोमेय्यांच्या जिल्हा दौर्याने जिह्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सर्वसामान्यांची अडचण झाली असती. तसेच गेल्या दहा दिवसांपासून पोलीस कर्मचारी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त होते, त्यांना विसर्जनाच्या दुसर्याच दिवशी अशा परिस्थितीत पुन्हा बंदोबस्ताची जबाबदारी देणे शक्य नव्हते. त्यामुळे जिह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकार्यांसह प्रशासनातील अधिकार्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. कोविडच्या काळातही जिह्यात 144 कलम लागू केले होते.