जिह्याचा भरभरून विकास करणार, जिह्यात महायुतीचे आमदार वाढवणार
प्रतिनिधी/ सातारा
आम्ही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मत मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने मते मागितली होती. लोकांनी आम्हाला शिवसेना-भाजपा महायुती म्हणून निवडून दिले होते. परंतु ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्यांच्याशीच अनैसर्गिक आघाडी केली होती. या अडीच वर्षात जे आमच्यासोबत हरले त्यांनाच ज्यादा निधी दिल्याचे बाब आम्ही वारंवार निदर्शनास आणून दिली तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आम्हाला उठाव करावा लागला. आता शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार आले आहे. जिह्याला भरभरुन विकास करणार आहोत, असे स्पष्ट मत आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावरुन सरळ त्यांनी आम्ही त्यांना किमंतही देत नाही, अशा शब्दात उत्तर दिले.
साताऱयात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई हे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 164 विरुद्ध 99 ने विश्वास ठराव जिंकला आहे. पहिल्याच दिवसापासून सरकार कामाला लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अधिवेशन संपल्यानंत सूचना दिल्या आहेत की मतदार संघात जावून कामे करा, अशा सूचना दिल्या ओहत. त्यानुसार मतदार संघात पावसाची परिस्थिती काय आहे?, पेरणी झाली आहे काय?, पिकांची परिस्थिती काय आहे मतदार संघात निघालो आहे. काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी अनैसर्गिक आघाडी होती
ज्या शिवसेना-भाजपा युतीच्या नावावर आम्ही मत मागत होतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे फोटो बॅनरवर लावून मते मागितली होती. मतदारांनीही आम्हाला शिवसेना आणि भाजपा युती म्हणूनच निवडून दिले होते. परंतु पुढे अनैसर्गिक आघाडी झाली होती. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर काय झालं माहिती नाही. पक्षप्रमुखांनी ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावपातळीवर कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱयांची गळचेपी झाली. आम्ही कित्येकदा शिंदे साहेबांना सांगितले. शिंदे साहेबांच्याकडे आम्ही वारंवार कैफियत मांडली. त्यामुळे हा उठाव झाला. आता नैसर्गिक युती झालेली आहे. आता जिह्याचेच मुख्यमंत्री आहेत. अडीच वर्षातील बॅकलॉक भरुन काढू, असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांना बेदखल
रेडय़ावरुन आपल्यावर टीका करणाऱया संजय राऊत यांच्याबाबत काय मत आहे अशी पत्रकारांनी विचारणा केली असता देसाई म्हणाले, संजय राऊत यांना आम्ही मोठे मानत नाही. ते सरकारमध्ये नव्हते. त्यांना आम्ही एवढे स्थान देत नाही. चाळीस रेडे काय करु शकतात हे त्यांनी पाहिले आहे, असे त्यांनी उत्तर दिले.
आमदारांची संख्या वाढणार
जिह्यात शिवसेना आणि भाजपाचे संख्याबळ वाढणार आहे. येत्या निवडणुकीत हे चित्र दिसेल असे सांगत देसाई म्हणाले, शिंदे साहेब आमचे नेते आहेत. जिह्याला भरभरुन निधी देतील, जिह्याने मागायचे आणि त्यांनी द्यायचे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पैसे मिळाले आहेत असा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, तुम्ही पुरावे द्या, पुरावा सापडला तर आम्ही राजकारण सोडून देऊ, असा प्रतिसवाल पत्रकारांनाच त्यांनी केला.
उदयनराजे मित्र आहेत
सुरत, गुजरात करण्याऐवजी जलमंदिरात थांबला असता तरी कोणी आले नसते याबाबत तुम्हाला काय वाटते असा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, उदयनराजे हे आमचे चांगले मित्र आहेत ते मित्रच राहु द्यात, असे हा बंड नव्हते तर उठाव होता, असे सांगत धर्मंवीर चित्रपट हा कोरोनापूर्वीच शिंदेसाहेब काढणार होते. त्यांची इच्छा होती. कोरोनानंतर हा चित्रपट त्यांनी आणला, असेही त्यांनी सांगितले.