ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्रातील राजकिय स्थिती ही विरोधकांकरवी जाणिवपुर्वक ढवळण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. पण आघाडी सरकार अस्थिर करण्याचं कारस्थान पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच भेट घेतली. यावर मलिक यांनी टिका केली. राज्यपाल कोशारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आघाडी सरकार अस्थिर होईल, असे भाजपने म्हंटले आहे. मात्र असा कोणताही अस्थिरतेचा कट राज्य शासन शिजू देणार नाही, उलट ते अधिक सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास मंत्री मलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजप सरकारला सत्तेची सवय लागली असल्याने त्यांना सध्याचा त्रास होत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांच्या बदली संदर्भात मंत्री मलिक यांनी केला गंभीर आरोप
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी बोर्ड कार्यरत आहे. हे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. हे बोर्डच पोलिसांच्या बदली संदर्भात शिफारस करत असते. याच बरोबर कनिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजींच्या अधिकाराअंतर्गत येतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का ?, असा गंभीर सवाल मलिक यांनी केला. तसेच राज्यात भाजपचे सरकार असताना काय काय कारनामे केले हे आम्हाला ज्ञात आहेत. ते आम्ही बोलल्यास विरोधकांना पळताभुई थोडी होईल असा इशारा ही मंत्री मलिक यांनी विरोधकांना दिला.