प्रतिनिधी / कोल्हापूर
महावितरणकडून एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डावलून अर्ज छाननी प्रक्रीया राबविण्यात येत आहे. या प्रक्रीयेच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक झाल असुन बुधवार 2 डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयासामोर आंदोलन करण्यात येणार आहे. एमएसईबी, एमपीएससी आणि 2014च्या एसईबीसीतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप समन्वयक दिलीप पाटील यांनी केला असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत समन्वयक दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी भूमिका मांडली. पाटील यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी वैचारिक आणि कायदेशीर गोष्टींसाठी वकील तसेच विचारवंतांचा फोरम उभा रहावा, अशी मागणी केली. तर तोडकर यांनी आरक्षण प्रश्नी समाजाने आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. महावितरण, राज्यसेवा परीक्षेत एसईबीसीमधील विद्याथ्यांना डावलण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही बाब मराठा समाजातील युवक-युवतींवर अन्याय करणारी असल्याने या विरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. बुधवार 2 रोजी जिल्हÎाच्या ठिकाणी तर 8 रोजी मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सरकार जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाही, तो पर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.