किल्लारी विकासापासून कोसो दूर
प्रतिनिधी/ किल्लारी
येथील भूकंप होऊन 28 वर्ष झाले. मात्र किल्लारीकरांच्या विविध अडचणी मात्र कायमच आहेत. लातूर जिह्यातील औसा तालुक्मयातील किल्लारी हे गाव सर्वात मोठे असून, भूकंपामुळे किल्लारीची ओळख संपूर्ण जगभर झाली आहे. मात्र किल्लारीकरांच्या अडचणी कायमच आहेत. यामुळे किल्लारीकरांतून संतापाची लाट उसळली आहे. किल्लारी गावात अंतर्गत रस्त्याची दूरवस्था झाली असून पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. तर घागरभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. एक हजार व आठशे रुपये देऊन टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. धरण उशाला व कोरड घशाला अशी अवस्था किल्लारी करांची झालेली आहे.
तसेच किल्लारी गावात शासनाने वाटप केलेली घरे असून, अनेकजण एकाच्या घरात दुसरा तर दुसऱयाच्या घरात तिसरा घुसून राहत आहे. तर कबाला एकाचा तर राहतो दुसराच याकडे महसूल विभगाचे दुर्लक्ष असल्याने व महसूल विभाग मूग गिळून गप्प बसत असल्याने येथील जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱयाने किल्लारीकडे लक्ष घालून होणाऱया घुसखोरीला तत्काळ आळा घालावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ज्या लोकांना कबाला देण्यात आला आहे त्यांचे घर त्यांना ताब्यात देण्याची मागणी किल्लारी करांतून केली जात आहे.
किल्लारी हे गाव 40 हजार लोकसंख्येचे असून, नागरिकांना आपल्या घराकडे जायचे असेल तर अंधारातच रस्ता शोधत जाण्याची वेळ किल्लारीकरांवर आलेली आहे. फक्त शोसाठी खांबे उभे करण्यात आल्याची चर्चा गावभर होत आहे. तर किल्लारी येथे अद्याप मध्यवर्ती बसथानक झालेले नाही. तसेच लांब पल्ल्याच्या गाडÎा येथून धावतात. परंतु त्यांना रस्त्यावरच बस थांबवून प्रवासी घ्यावे लागत आहेत. यासाठी विविध समस्यांच्या विळख्यात किल्लारीकर सापडलेले आहेत. येथील ग्रामपंचायतीला कोटÎवधी रुपये निधी आला. मात्र किल्लारीचा विकास काही झाला नाही.
तर हा निधी गेला कोठे असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. परिसरातून कॉलेज, शाळा, बँक, ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठेत खरेदी विक्री करण्यासाठी लोक येजा करतात. यासाठी त्यांना हिवाळा, पावसाळा, उन्हाळा बसची वाट पाहत रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. यासाठी संबंधित अधिकाऱयाने व लोकप्रतिनिधी यांनी किल्लारीच्या विविध समस्या सोडवून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी किल्लारीकरांतून केली जात आहे.