आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रतिपादन, वाळपईतील महिला मेळावा
प्रतिनिधी /वाळपई
भाजपा सरकारने महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्दिष्टाने अनेक योजना कार्यान्वित केलेले आहेत. त्यापैकी स्वावलंबन ही योजना महत्त्वाची असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या योजनेचा गोव्यातील महिलांनी मोठय़ा प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई येथील महिला मेळाव्यात केले.
वाळपई येथील मैदानावर या महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी स्वावलंबन योजनेच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे, दीपाली नाईक, उपसचांलक ज्योती देसाई, वाळपई नगराध्यक्ष सेहझीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, सामजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, प्रकल्प अधिकारी छाया कडकडे, स्वाती प्रभू,, जि. पं. सदस्य देवयानी गावस, जि. पं. सदस्य राजश्री काळे, सरपंच वंदना गावस, संतोष गावकर, प्रशांत मराठे, अस्मिता गावडे आदींसह इतरांची उपस्थिती होती.
‘स्ववलंबन’ विकासातील महत्त्वाचा टप्पा !
समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकासाचा प्रवाह निर्माण करण्याच्या दृष्टिकनातून सरकारच्या अनेक योजना कार्यान्वति झालेले आहेत. मात्र महिला व मुलांच्या विकासाच्या प्रवाहाला स्वावलंबन योजनेचा आधार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ही स्वावलंबन योजना येणाऱया काळात गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष.
यावेळी उसगाव गांजेचे पंच सभासद रामनाथ डांगी, सरपंच संतोष गावकर यांचीही भाषणे झाली. सुरुवातीला समई प्रज्वलित करून या महिला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. महिला व बाल कल्याण खात्याच्या उपसंचालिका ज्योती सरदेसाई यांने स्वागत केले. त्यानंतर सत्तरी तालुक्मयातील सुमारे तीनशे स्वयंसेवक गटांना स्वावलंबन योजनेची मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली. सर्वप्रथम सिद्धी शेलार व गटातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले. प्रकल्प अधिकारी छाया कडकडे यांनी आभार मानले.