महिला आणि बालविकास मंत्रालयाचा खुलासा
दिल्ली / प्रतिनिधी
महिला आणि बालविकास मंत्रालयाने राज्यसभेत सीपीआय(एम) च्या खासदार झरना दास बैद्य यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डेटा सार्वजनिक केला. बुधवारी, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या डेटाचा हवाला देऊन गेल्या वर्षी देशभरात एकूण ३,७१५०३ महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली होती, असे सरकारने संसदेत सांगितले.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून आलेली आकडेवारी असे दर्शवते की २०२० मध्ये, ३९८३२० लोकांना महिलांवरील गुन्ह्यांसंदर्भात अटक करण्यात आली होती तर ४८८१४३ महीलांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैका ३१४०२ महिलांना दोषी ठरवण्यात आले होते. तसेच, शहरांमधील महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये २०२० मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 8.3% ने घट झाली आहे. महिलांवरील गुन्ह्यांमध्ये बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, छळ, ऍसिड हल्ले आणि अपहरण यांचा समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ४९३८५ अशी प्रकरणे आढळली, त्यानंतर पश्चिम बंगाल (३६४३९), राजस्थान (३४५३५), महाराष्ट्र (३१९५४) आणि मध्य प्रदेश (२५६४०) आहेत.