ऑनलाईन टीम / मुंबई :
एसटी कामगारांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्रता वाढली आहे. त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे. आज सकाळी तीन-चार आंदोलनकर्त्या महिलांनी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मागील आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे. संपाच्या पहिल्या दिवसापासून एसटी कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर काही कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर आले आहे.