प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी यांच्यावतीने बेळगाव शहरातील गरजू कुटुंबांना रविवारी जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. लॉकडाऊन काळात गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्य मिळविणे कठीण बनले आहे. या संघर्षाच्या काळात अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. याची दखल घेऊन महिला आघाडीतर्फे रविवारी शहरातील दीडशेहून अधिक गरजू कुटुंबांना साखर, बटाटे, कांदे, चहापावडर, तांदूळ आदीसह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, खडेबाजारचे सीपीआय धिरज शिंदे, बाळासाहेब काकतकर, शिवाजी हंडे, सुहास किल्लेकर, अजित कोकणे, अमित जाधव, भरत किल्लेकर, प्रमोद किल्लेकर, श्रद्धा मंडोळकर, भाग्यश्री जाधव, मोहन किल्लेकर, शामिनी पाटील आदीसह मान्यवर उपस्थित होते.