बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर म्हणाल्या, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात शिवाजी महाराजांनी इतकेच मोलाचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले. त्यांनी केलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा बनू शकले. राजमाता जिजाऊंनी केलेल्या त्या संस्कारामुळेच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत याचेच एक उदाहरण म्हणजे माधुरी जाधव असे त्या म्हणाल्या.
सत्काराला उत्तर देताना माधुरी जाधव म्हणाल्या, बस्तवाड येथे एक रुद्ध दाम्पत्य राहत होते.त्या रुद्धचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नी वर आभाळ कोसळले त्या असंयम महिलेच्या मदतीसाठी कोणीच आले नाही याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अंगोळकर यांना मिळाली त्यांनी मला जाण्यास सांगितले मी ?म्ब?लन्स घेऊन त्या ठिकाणी गेले परंतु कोणीच मदत करण्यास तयार नव्हते अखेर मी एकटीने त्या वृद्धावर अंत्यसंस्कार केल्याचा हृदयद्रावक अनुभव त्यांनी सर्वांसमोर व्यक्त केला बेळगावच्या डॉक्टर सविता कद्दू यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन भातकांडे यांनी केले.प्रभावती सांबरेकर यांनी आभार मानले। यावेळी अनुपमा कोकणे, समृद्धी कोलेकर, भाग्यश्री जाधव, राजश्री बाभुळकर, माला जाधव, प्रभावती सांबरेकर, दीपा मुतगेकर पवित्रा पाटील शकीरा गोकाक मेघा किल्लेकर राजश्री बडमंजी श्रद्धा मंडोळकर यासह महिला उपस्थित होत्या.