वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे पुरुष व महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱयावर जाणार असून 2 जून रोजी दोन्ही संघ एकत्रितच चार्टर विमानाने इंग्लंडकडे प्रयाण करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडणार आहे.
19 मे रोजी पुरुष व महिला दोन्ही क्रिकेट संघ मुंबईत दाखल होणार असून त्यांना दोन आठवडे क्वारन्टाईनमध्ये रहावे लागणार आहे. मात्र देशाच्या पश्चिम किनाऱयावर वादळ सुरू असल्याने त्यांच्या आगमनाला थोडा विलंब होण्याची शक्यता असल्याचे सोमवारी बोलले जात होते. बीसीसीआय 19 व 24 मे रोजी दोन्ही खेळाडूंनी एकत्र येण्याची तारीख निश्चित करण्याचा विचार करीत आहे. कोहलीचा संघ इंग्लंडमध्ये एकूण सहा कसोटी खेळणार असून त्यातील एक कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत असणार आहे. ही कसोटी 18 जूनपासून सुरू होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महिला संघ जूनच्या मध्यावर इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळल्यानंतर तीन वनडे व तीन टी-20 सामनेही खेळणार आहे.
एका वृत्तानुसार, मुंबईत राहणाऱया खेळाडूंव्यतिरिक्त पुरुष संघातील 20 खेळाडू बुधवारी 19 मेपासून हॉटेलमध्ये क्वारंटाईन होतील. उर्वरित खेळाडू व मुंबईत वास्तव्यास असणारे संघव्यवस्थापनातील सदस्य 24 मे रोजी हॉटेलमधील बायोबबलमध्ये दाखल होतील. या खेळाडूंत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्राr यांचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतरही दोन्ही संघांना दहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.