3 जानेवारी हा आद्य थोर स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस भारतीय शिक्षण व्यवस्थेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच या देशात स्त्री शिक्षणाला प्रारंभ झाला आणि हा प्रवाह आताच्या महिला सबलीकरणापर्यंत पोहोचला. या देशातील कोणतीही महिला या विश्वात आपलं नाव कमावत असेल, तर त्यामागे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य मंत्रिमंडळाने सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आता ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचे आपण स्वागतच करायला हवे. शिक्षण तज्ञ, माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सावित्रीबाई यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आणि या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली. माणसाच्या अज्ञानातूनच माणूस दु:खाकडे आणि वेदनेकडे जात असतो. मात्र, अज्ञान दूर करायचे असेल, तर माणसातली विचारशीलता वाढायला हवी आणि विचारशीलतेसाठी समाज सुशिक्षित बनायला हवा. समाज सुशिक्षिततेचा एक मार्ग शिक्षणातून जात असतो. समाजातील स्त्राr-पुरुष व्यवस्थाही समांतर असते, तेव्हा समाज समतोल राहतो. त्याकाळी पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता पण महिलांना नव्हता. तो अधिकार फुले दांपत्याने महिलांना दिला. त्यासाठी अज्ञान, जातीभेद, स्त्राr-पुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी फुले दांपत्याने 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही देशातील पहिली कन्या शाळा. यावरून या देशाच्या शिक्षण चळवळीत फुले दांपत्याचे महत्वपूर्ण योगदान लक्षात येऊ शकते. असे असले, तरी फुले दांपत्याला बहुजनांचे कैवारी असे म्हटले जाते. समग्र माणसाला ज्ञानी बनवणाऱया दांपत्याला एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित कसं काय केलं जातं? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच सावित्रीबाईंचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून आता राज्यात साजरा होत आहे, तो समग्र जात-धर्म वर्गातल्या महिलांचा सन्मान आहे. सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी स्त्राr शिक्षणासाठी चळवळ उभी करणे ही सोपी गोष्ट नव्हती. समाजाचा कडवा विरोध पत्करून ही चळवळ फुले दांपत्याने सुरू केली. समाजातील प्रत्येक घटक ज्ञानी बनवायचा असेल, तर आधी विरोध पत्करावा लागतो, हे संतांपासून आधुनिक महापुरुषांपर्यंत सगळय़ांनी अनुभवलं आहे. तो विदारक अनुभव फुले दांपत्यानेही घेतला. सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाचे कार्य सुरू केलं, तेव्हा त्यांच्यावर शेण फेकले गेले. दूषणं देऊन बोल लावले गेले. तरी सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यामुळे त्याकाळी स्त्राr-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारून तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज फुले दांपत्याने दिली. समाजाप्रती सहजजीवन जगणे ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी व्यक्तिगत स्वार्थाचा त्याग करावा लागतो. संपूर्ण समाज आपलाच आहे ही आपलेपणाची भावना आपल्यात रुजवावी लागते. फुले दांपत्य हे मातृहृदयी होते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक कामही उभारले. बालविवाहाला त्यांनी विरोध केला. बालविवाहाला विरोध करून ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठय़ा हिकमतीने पार पाडलं. आजच्या काळातही विधवांचा पुनर्विवाह यासंदर्भात समाजात उलटसुलट चर्चा होत असतेच पण त्या काळात हे धाडस फुले दांपत्याने दाखविले. त्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारसमोर प्र्रस्ताव ठेवला आणि विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली. या सामाजिक कार्यात फुले दांपत्याला यश येऊन त्याला 1856 मध्ये मान्यता मिळाली. सावित्रीबाई फुले या चतुरस्त्र होत्या. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, समाजमाता, समाजसेविका अशा विविध भूमिकांतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले. त्याकाळी आतापेक्षा स्त्रियांचे प्रश्न भीषण होते. बाईला घराबाहेर पडणं सोडूनच द्या पण डोकावताही येत नव्हतं. त्यामुळे तिचे स्वातंत्र्य, तिची अभिव्यक्ती हा प्रश्न तर तिच्यासमोर गौण ठरत होता. पण हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी केलेले कार्य अजोड असेच आहे. समाजातलं स्त्राrदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून स्वावलंबी बनावं म्हणजे त्यांना आपल्या खऱया शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही. हा ठाम विचार त्यांनी संपूर्ण समाजासमोर मांडला. फुले दांपत्याने महिलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली, तेव्हा अनेकांनी त्यांचा गौरव केला खरा पण यामागे त्यांचा किती त्याग होता, याचा विचार केला गेला नाही. ज्योतिरावांनी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. यासाठी ज्योतिरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. पुढे त्या पहिल्या भारतीय शिक्षिका गणल्या गेल्या. पाहता-पाहता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं. त्या काळी संस्था सुरू करणे हे एक दिव्य होते. इतकेच नव्हे, तर शाळांतील मुलांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता तसेच ‘आवडेल ते शिक्षण’ देण्यावर भर दिला. आजच्या शिक्षण पद्धतीला हे आदर्शवत आहे. आज आपल्याकडे शिक्षण तज्ञ एकत्र बसतात आणि शिक्षण कोणत्याप्रकारे समाजाला द्यावे, यावर विचार करतात. सरकार त्यानुसार शिक्षणाचे धोरण आखतं. परंतु यात कोणाला कोणतं शिक्षण आवडीनुसार घ्यायचं आहे, याचा विचार केला जात नाही. फुले दांपत्याने मात्र असा विचार दीडशे-पावणेदोनशे वर्षांपूर्वी केला. यावरूनच या दांपत्याची शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी किती मोठी होती हे आपल्या लक्षात येईल. सावित्रीबाईंनी जोतिरावांना दिलेली साथ अजोड होती. अर्थात अशी माऊली अनेक शतकांतून एखाद्या वेळीस जन्मास येते. सावित्रीबाईंना अभिवादन !
Previous Articleथेम्सच्या तीरावरून
Next Article मध्यप्रदेशात धार्मिक स्वातंत्र्य विधेयकाला मंजुरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.