गेल्या आठवडय़ात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती साजरी केली गेली. लग्नाच्या वेळेस अशिक्षित असलेल्या सावित्रीबाईंनी स्वत:ला शिक्षित केले. शिक्षक प्रशिक्षण प्राप्त करून घेतले. पुण्यातील भिडेवाडा येथे देशातील पहिली महिला शाळा उभारली व देशात स्त्राr शिक्षणाची नांदी गायिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी केवळ मुलींच्या शिक्षणासाठीच नव्हे तर महिला सशक्तीकरण, स्त्राr हक्क चळवळ आणि सामाजिक रुढी-सनातनी प्रवृत्तींविरुद्ध लढा दिला. सती, बालविवाह, विधवांचे मुंडन, प्रचलित जातीव्यवस्था यासारख्या सामाजिक अन्यायाविरोधात त्यांनी रान उठविले. आपल्या देशात महिला हक्काबाबत उघड बोलणाऱया त्या पहिल्या महिला ठरल्या. मौखिक अवहेलना, सामाजिक बहिष्कार, अपमान सोसत तथाकथित उच्चभ्रू वर्गांकडून उपहास व पुराणमतवादी मतांचा प्रतिकार प्रागतिक विचारांनी केला.
भारताच्या आधुनिक शिक्षण परंपरेत सावित्रीबाईंनी केलेले कार्य विसरता येण्याजोगे नाही. 1850 च्या दशकात सावित्रीबाई व ज्योतीराव फुले यांनी महार व मांग समाजातील मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा काढली. ज्योतिरावांसकट शाळेतील सुरुवातीच्या नऊ मुलींना शिकविता शिकविता पुण्यात तीन वेगवेगळय़ा महिला शाळा सुरू केल्या व जवळपास एकत्रित दीडशे मुलींची पटसंख्या जमवली. तद्नंतर महाराष्ट्रात तब्बल 18 शाळा संस्था 1848 ते 1852 या काळात सुरू करून दलित, पीडित, शोषित समाजातील मुलींसह उच्चभ्रू समाजातील महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली.
डोक्मयावरून पदर, पुरुषांचा आदर, घरची चूल व आपले मूल या चौकटीत जीवन बंदिस्त करून घेणाऱया तत्कालीन स्त्रियांना फुले दांपत्याने विश्वाला गवसणी घालता येणारे शिक्षण संदर्भ, वैचारिक बळ व तात्विक बैठक उपलब्ध करून दिली. आपल्या समाजाने निर्माण केलेल्या भेदभाव, स्पृश्य-अस्पृश्य, शिक्षणाचा दुरावा व आर्थिक निर्बलता यापासून मुक्त होण्यासाठी शिक्षणाची ज्योत घेऊन पुढे येण्यासाठी उद्युक्त केले. विधवांना पुनःसौभाग्य, अस्पृश्यांना न्याय, बलात्कारित-पीडितांसाठी आसरा, अनौरस मुलांसाठी निवारा, महिला हक्कांबाबत जागृती, इत्यादींसाठी सेवाभावी मंडळांची मेढ रोवली. बालविवाह विरोधात मोहीम, विधवांचे पुनर्विवाह सोहळे व शोषितांची वकिली करण्याचे व्रत त्यांनी अखंडपणे पाळले.
शिक्षण प्रसाराबरोबरच सामाजिक सलोखा व प्रागतिक विचारांचा घास समाजाला भरविण्यासाठी फुले दांपत्य राबले. जाती, धर्म, भेद व वर्गाच्या पदानुक्रमाची पर्वा न करता सावित्रीबाईंनी सर्वसमावेशक व्यासपीठाची निर्मिती केली. शिक्षणाबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य व समानतेला प्रोत्साहन दिले. हुंडाविरोधी चळवळ, आचारविचारांची सूट व समाजाप्रती कार्यरत होण्याची नवदृष्टी दिली.
अस्पृश्यांसाठी आपल्या अंगणात विहीर खोदून सर्व समाजाला पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. जातीच्या अडथळय़ांतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य देत महिलांना सत्तेमध्ये पुरुषांसमवेत बसविण्याचे, त्यांना बोलते करण्याचे कार्य केले. सावित्रीबाईंनी स्त्राrशिक्षण दिले, याचा अर्थ फक्त पुस्तकी ज्ञान व अक्षरओळख यापुरती शिक्षणाची व्याख्या नसून जगण्याचा नवा अर्थ, कार्याला सार्थ विचार व सामाजिक क्रांतीचे बाळकडू दिले. आत्मनिर्भरता, स्वाभिमान, स्वातंत्र्य, सबलीकरण, सशक्तीकरण या कल्पनांना वस्तूरूप देणारे बोलते फिरते विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई जगल्या.
सावित्रीबाईंच्या शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिकता व नाविन्य होते. भिडेवाडय़ातील अभ्यासक्रमात पारंपरिक भाषा, विज्ञान, व्याकरण यापेक्षाही इंग्रजी, गणित व समाजशास्त्र या विषयांवर अधिक भर होता. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्त्या यांचा उपयोग, पालक-शिक्षक मंडळे, पालक-शिक्षक बैठका, अध्यापन शास्त्रावर भर अशी दूरदृष्टी असणाऱया पद्धती राबवून त्यांनी शिक्षणपद्धती शास्त्रनि÷ व तार्किक बनविली. त्यांनी वापरलेली शिक्षणपद्धती तत्कालीन इंग्रजांच्या सरकारी शाळात वापरल्या जाणाऱया पद्धतीपेक्षाही श्रे÷, भिन्न व नाविन्यपूर्ण होती.
शिक्षणाला सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बदलाचे साधन म्हणून उपयोगात आणून पारंपरिक वैचारिक गुलामीपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या साहित्यिक योगदानात स्त्राrवादी साहित्याचा दृष्टीकोन सापडतो. त्यांच्या समृद्ध व प्रगल्भ वैचारिक लेखणीतून 1854 साली ‘काव्याची फुले’, ‘बावन्नकशि’ व 1892 मधील ‘सुबोध रत्नाकर’ या रचनांमधून त्या कट्टरपंथी विचारांवर, सनातनी वर्चस्ववाद व पुराणवादी मतांविरुद्ध जळजळीत अंगार ओकतात.
सावित्रीबाईंचा पत्रव्यवहारदेखील आजच्या तंत्रभूमीत प्रागतिक समाजाच्या विचारांची बांधीलकी जपणारा विचार गवसतो. तत्कालीन महिला, त्यांचे जीवन, राहणीमान व जगण्याच्या अनुभवाची अंतर्दृष्टी वाचकाला समृद्ध करते. तत्कालीन समाजाने स्त्रियांचे केलेले अंतर्निहित शोषणाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीतून आपल्याला दिसते. त्यांची लिखित भाषा प्रभावी, थेट व तीक्ष्ण आहे व जाती-लिंग भेदाच्या मर्यादा त्या व्यक्त करतात. ज्योतिबांच्या भाषणांचे त्यांनी केलेले खंडनिहाय संपादन व प्रकाशन शिक्षणाबरोबरच साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे अतुलनीय योगदान अधोरेखित करते. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील विविध राज्यांमधून महिला मुख्यमंत्रींपासून देशाच्या प्रधानमंत्री, राष्ट्राध्यक्षपदी महिला आरुढ झाल्या. त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाईंच्या ज्ञानज्योतीला द्यावेच लागेल.
आज देशभर महिला शाळा, महिला महाविद्यालये, महिला वसतीगृहे, देशभरातील उद्योग, क्यवहार आस्थापनांमध्ये महिलांची वाढती व्याप्ती पाहिली की आजच्या नव्या भारतासाठी सावित्रीबाईंनी सोसलेल्या शिव्या, शेण, दगड-धोंडय़ांची आठवण आम्हाला यावी. आज देशात अंगणापासून रणांगणात आणि तारांगणापर्यंत महिलांनी प्रचंड भरारी घेतली असून संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात पुरुषांपेक्षाही महिलावर्गाचे यश उल्लेखनीय आहे असे जाणवते. याचे श्रेय द्यावे तर सावित्रीबाईनाच. भारतातील स्त्राrवादी चळवळीच्या अग्रणी असताना सावित्रीबाईंनी प्लेगविरुद्ध युद्ध उभारले. प्लेग संसर्गाच्या काळात जनसेवा करण्यासाठी आपल्या दत्तक मुलासकट त्यांनी सेवा-शुश्रूषा केंद्र उभारले. हाच संसर्ग त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
आपल्या समाजात महिलांना समानतेने, आदराने व हक्कांच्या परिभाषेत रास्तपणे वागणूक मिळावी म्हणून सावित्रीबाई आपल्या जीवनाचे तेल करून क्रांतीज्योत पेटविली. महाराष्ट्र शासनाने यावषी सुयोग्य निर्णय घेत राज्यात त्यांच्या जन्मदिनी (3 जानेवारी) रोजी दरवषी ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याबद्दल अभिनंदन. देशातील अग्रणी महिला शिक्षिका, पहिल्या महिला प्राचार्यांना मन:पूर्वक अभिवादन.
डॉ. मनस्वी कामत