ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधी गट महिला सुरक्षेवरुन वारंवार टीका करत असतात. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी भाजपला घरचा आहेर देत उत्तर प्रदेशात महिलांसाठी किती असुरक्षित आहे. ही बाब अधोरेखीत केली आहे.
वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी मोहोत्सव कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी योगी सरकारच्या शासन व्यवस्थेत महिलांसाठीची स्थिती नेमकी कशी आहे. हे नेमकेपणाने मांडत त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महिलांसंदर्भात भाष्य करताना बेबी राणी मौर्य यांनी पोलीस स्थानकांमधील सुरक्षेबद्दल वक्तव्य केलं आहे.
पोलीस स्थानकात महिला अधिकारी आणि उपनिरिक्षक बहुतांशी नसतात. यामुळे महिलांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अंधार झाल्यावर पोलीस स्थानकात कधी जाऊ नये. अगदीच गरज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या भावासोबत किंवा पतीसोबत किंवा वडिलांसोबत पोलीस स्थानकात जा असे वक्तनव्य करत राज्यातील पोलिस स्टेशनमध्ये महिला सुरक्षा कितपत आहे. यावर भाष्य केले आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित आहेत. यावर ठाम असणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी महिलांनी केलेलं विधान हे परस्पर विरोधी असल्याने यावर भाजपचे वरिष्ट नेते नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.