पनवेलनजीकची धक्कादायक घटना :
भांडणातून झाली हत्या
नवी मुंबईत महिलेला फासावर लटकवून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधील दुन्द्रs गावात ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाच आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहितीनुसार, शेजारील रहिवाशांबरोबर भांडणातून ही हत्या झाली असल्याचे समोर आले आहे. या वादातून महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आरोपींनी तिला गळफास देऊन हत्या केली. 55 वर्षीय शारदा गोविंद माळी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मंगळसूत्र चोरले असल्याचा आरोप मयत महिलेवर आरोपींनी केला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेला गळफासावर लटकवले. या प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात शेजारी राहणाऱया आरोपींनी त्यांची हत्या केली. शारदा यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्यांना फासावर लटकवून त्यांची हत्या करण्यात आली. पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, शारदा यांची अवस्था पाहता त्यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर फासावर लटकवून हत्या केल्याचा आरोप मयताची मुलगी आणि पतीने केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये अलका गोपाळ पाटील (45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विठ्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.
हा महाराष्ट्राला कलंक : चित्रा वाघ
मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणावरून शेजारी राहणाऱया आरोपींची आणि मयत महिलेच्या कुटुंबाचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरत आरोपींनी शारदा माळी यांच्या घरात प्रवेश केला. घरात त्या एकटय़ा पाहून त्यांची हत्या करून आरोपी फरार झाले. दरम्यान, या घटनांमुळे महाराष्ट्राला कलंक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी गफहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्याचाही आरोपही भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केला.
माटुंगा रेल्वे स्थानकातील सिरियल किसरला अटक
माटुंगा रेल्वे स्थानकावर 26 जानेवारी रोजी एका तरुणीचा विनयभंग करणाऱया विकृत सिरियल किसरला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या नराधमावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, छेडछाडीबाबत तक्रार देण्यासाठी अद्याप एकही महिला पुढे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या विकृताचे नाव रजीउर खान असे आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी दुपारी सीसीटीव्हीत कैद झाली. पीडित तरुणी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावरून जात असताना हा प्रकार घडला. पुलावर कोणीही नसल्याचे पाहून एक मनोविकृत तरुण पाठीमागून आला आणि बळजबरीने तिचे चुंबन घेतले. त्यानंतर लगेचच त्याने तिथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेली तरुणीही तिथून निघून गेली. मात्र, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या आधारे पोलिसांनी संबंधित विकृताला अटक केली आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेला तरुण विकृत असून त्याने अनेकदा हा प्रकार केल्याचे समजते. 25 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यानंतर तो आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेऊन महिलेकडे पाहून अश्लिल वर्तनही करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर 26 जानेवारीला पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी तो जबरदस्ती तिचे चुंबन घेऊन पळ काढतो. माटुंगा रेल्वे स्थानकावरील 6 आणि 7 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱया पुलावर हा प्रकार घडला आहे.
विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी एका विवाहितेला धमकावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास काशिमिरा (भाईंदर) परिसरात घडली. 26 वर्षीय पीडित विवाहिता रात्री आपल्या दोन मुलांसह घरी निघाली होती. त्यावेळी आरोपीने तिचा रस्ता अडवून अत्याचाराचा गुन्हा मागे घे, अशी धमकी दिली. त्यास नकार दिल्यामुळे आरोपीने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून सदर महिलेने आरडाओरड केल्यामुळे काही नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले त्यामुळे आरोपीने पळ काढला. महिलेच्या तक्रारीवरून या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.