प्रतिनिधी / सातारा :
मालमत्तेच्या वाटणीवरुन रामनगर वर्ये येथे एका महिलेला पाच जणांनी बॅटने आणि हाताबुक्यांनी मारहाण केली. दि. 12 रोजी दुपारी 4.30 वाजता ही घटना घडली.याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रतापसिंहनगर येथील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रेमानंदन विलास आवळे, प्रसाद विलास आवळे (दोघे रा. प्रतापसिंहनगर), मनिषा प्रसाद आवळे (रा. घणसोली), मनिषा प्रकाश आवळे, दीपा प्रकाश आवळे (दोघी, रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निता प्रशांत सपकाळ (वय 39, रा. रामनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी निता सपकाळ यांची आई मालमत्तेच्या वाटणीवरून भावाशी भांडण करुन निघून गेल्याच्या रागातून वरील पाच संशयित आरोपींनी नीता सपकाळ यांना बॅटने तसेच हाताने मारहाण केली. सहाय्यक फौजदार बागवान अधिक तपास करत आहेत.