माजी आमदार आडम मास्तसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अटक
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कृषी कायदायच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने आज मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या बंदला हिंसक वळण लागले असून, माकपच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये पोलिसांनी मारहाण केली. मारहाण करीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना फरफटत नेले. काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. एकंदरीत दिवसभर शांततेत चाललेल्या मोर्चाला पोलिसांकडून दडपशाही करत मारहाण झाल्याने हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.