कणबर्गी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी येथे सध्या केवळ चार एकरच गायरान जागा शिल्लक आहे. यापूर्वी अनेक समाजांना तसेच इतर कामासाठी जमिनी दिल्या गेल्या आहेत. तेव्हा एससी लोकांसाठी स्मशानभूमी नाही. त्यासाठी किमान दोन एकर जागा राखीव ठेवून त्यांना द्यावी, अशी मागणी कणबर्गी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणबर्गी येथील जागा उद्योग क्षेत्रासाठी, आरटीओसाठी व इतर प्रकल्पांसाठी घेण्यात आली. काही जणांना आश्रय घरे बांधून देण्यात आली आहेत. जनता प्लॉटदेखील देण्यात आले. त्यामुळे जागाच शिल्लक नाही. तेव्हा आता जी जागा शिल्लक आहे, त्यामधील दोन एकर जागा एससी समाजासाठी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, संजय सुंठकर, किसन सुंठकर, राघवेंद्र पाटील, बाबू मेत्री, लक्ष्मण मेत्री, डी. सी. टोपी, प्रकाश जकाती, विवेक मेत्री, चन्नाप्पा टोपी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.