नवीदिल्ली : कृषी मंत्रालयाने नुकत्याच सादर केलेल्या माहितीनुसार कृषी अर्थसंकल्प 2009-10 च्या कालावधीत 12,000 कोटी रुपयांनी वाढून 1.34 लाख कोटी रुपयाच्या घरात पोहोचलेला आहे. सन 2014 नंतर गावं, शेतकरी, गरीब आणि कृषी आदी घटकांचा मोठय़ा प्रमाणात विकास होत गेला असल्याचे मंत्री संतोष गंगवार यांनी उद्योग संघ पीएचडीसीसीआय संमेलनात बोलताना म्हटले आहे. तसेच दुसऱया बाजूला शेतकरी विषयक सादर करण्यात आलेले कायदे हे शेतकऱयांच्या लाभाचे असून यात पिकांना योग्य भाव मिळण्यासोबत एका राज्यातून अन्य राज्यातही सदरचे पिक विकण्याची मुभा मिळणार असल्याचे मंत्री गंगवार यांनी स्पष्ट केले आहे. सदरच्या नवीन नियमावलीच्या प्रभावामुळे आगामी काळात देशातील व्यापाराला अधिकची चालना मिळणार असून सोबत सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध व आरोग्य संदर्भातीलही बदलास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले आहे. देशातील निर्यात सप्टेंबरमध्ये टेड डिफिसिट घटून तीन महिन्याच्या नीचांकी पातळीवर येत 2.91 अब्ज डॉलरवर आला आहे. सहा महिन्याच्या कालावधीनंतर निर्यात क्षेत्रात सुधारणा होत हा आकडा 5.27 टक्क्मयांनी वाढला आहे. याचाच येत्या काळात अर्थव्यवस्थेला सुधारणा प्राप्त करुन देणार ठरणार असल्याचेही तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Previous Articleबॉक्सर्सचे ट्रेनिंग युरोपमध्ये पुढील आठवडय़ापासून
Next Article पोलंडची स्वायटेक अंतिम फेरीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.