योगी आदित्यनाथ यांचा दावा
लखनौ
गेल्या साडेचार वर्षात आमच्या सरकारने 4.5 लाख तरुणांना सरकारी नोकऱया दिल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. सर्व तरुणांना गुणवत्तेच्या आधारावर नोकऱया देण्यात आल्या. या सर्व नेमणुका वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या. आमच्या सरकारने पूर्ण पारदर्शकतेने सर्वांची भरती केली आहे. भरतीमध्ये कुठेही गैरव्यवहार झालेला नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेश राज्याने व्यवसाय सुलभतेत एक मोठी झेप घेतली आहे. 2015-16 मध्ये उत्तर प्रदेश 14 व्या क्रमांकावर होता, आज राज्य दुसऱया क्रमांकावर आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.