वार्ताहर / राजापूर
येथील माजी उपनगराध्यक्ष अ. सलाम खतीब हे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
बुधवारी खतीब हे आपल्या पत्नीसह रानतळे येथे शाळेत पाल्याचा निकाल आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. भू फाटय़ानजीक त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन पती-पत्नी खाली कोसळले. या अपघातात खतीब यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली तर सलाम यांच्या छातीला मार बसला. त्यांच्यावर येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले होते. सायंकाळी त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथून कोल्हापूर येथे हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.