प्रतिनिधी / बेळगाव
माजी केंद्रीय मंत्री व शेतकरी नेते बाबागौडा पाटील यांचे शुक्रवारी सकाळी बेळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. बाबागौडा यांनी कर्नाटक राज्य रयत संघाची स्थापना केली. आणि नेहमी ते शेतकऱयांच्या हक्कासाठी लढत राहिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत बाबागौडा पाटील हे ग्रामीण विकास उद्योग मंत्री होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे.