ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन पक्षाचा झेंडा फडकवला. यशवंत सिन्हा हे वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते.
तृणमूल काँग्रेसमधील प्रवेशानंतर सिन्हा म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपचा एकमतावर विश्वास होता, पण आजच्या भाजपचा चिरडून जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल आणि बीजेडी यांनीही यामुळेच भाजपची साथ सोडली आहे. पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा आरोपही सिन्हा यांनी केला.