बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुंगांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन लावला आहे. यांची अंमलबजावणी मंनगळरी रात्रीपासून करण्यात अली आहे. यापार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान आणि राज्यसभेचे खासदार एच. डी. देवेगौडा यांनी राज्यातील १४ दिवसांच्या कर्फ्यूमुळे त्रस्त झालेल्या दैनंदिन मजुरांना भरपाई पॅकेज देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, मुख्य सचिव आणि आरोग्यमंत्री यांना उद्देशून पाठविलेल्या पत्रात देवेगौडा यांनी कामगारांना एक पॅकेज आणि कोविडच्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी हसनमधील रूग्णालयात आवश्यक त्या सुविधा देण्याची मागणी केली आहे.
प्रत्येक मजुरांना १० किलो तांदूळ, गहू आणि नाचणी उपलब्ध करुन द्याव्यात आणि किमान दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच तालुका रूग्णालयात ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी जंबो ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.