प्रतिनिधी / दापोली
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ दापोलीमध्ये जालगाव ग्रामपंचायतीमध्ये नुकताच करण्यात आला.
ग्रामपंचायत लगत असणाऱ्या पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घरातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच घरातील व्यक्तींना सहा मिनिटे चालायला सांगण्यात आले. यापूर्वी त्यांची ऑक्सिजन लेवल तपासण्यात आली. सहा मिनिटं झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. दापोली तालुक्यांमध्ये ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम घरोघर जाऊन राबवण्यात येईल अशी माहिती यावेळी तहसीलदार वैशाली पाटील व गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी पत्रकारांना दिली. या नाविन्यपूर्ण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जिल्हा परिषद सदस्य व माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच बापू उर्फ विकास लिंगावळे, पोलीस पाटील शिंदे यांच्यासह मंडल अधिकारी सुदर्शन खांविलकर, के. बी. आंभोरे, एस बी साळवे, शीतल जोशी, अस्मिता धाडवे, सुप्रिया गुंदेकर, अंकिता भांबीड, स्नेहा बर्वे, रसिका राऊत,विनोद नांदिस्कर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.