प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात सुरु असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या महत्वाकांक्षी अभियानातून कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्राsद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी येथे केले.
आपल्या एक दिवसाच्या रत्नागिरी दौऱयात त्यांनी या अंतर्गत आतापर्यंतच्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृहात झालेल्या एका बैठकीत घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक संगमित्रा फुले यांची प्रमुख उपस्थिती होती. जिह्याच्या मोहिमेअंतर्गत 15 लाख 40 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 75 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी याप्रसंगी दिली.
जिह्यात खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, अशा ठिकाणी रुग्णांना दिल्या जाणाऱया देयकांची तपासणी करूनच मग अदा केली जावीत. यात नागरिकांनी अधिक पैसे द्यावे लागू नये. याची खबरदारी घ्या, अशा सूचना राज्य मंत्री पाटील यांनी बैठकीत दिल्या. जिह्यात कोणत्याही प्रकारे औषधांचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी सामाजिक न्यायभवन येथील कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा महिला रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या म्दन्ग्d-19 रुग्णालयास भेट देऊन तेथील सुविधांबाबत माहिती घेतली व कोरोनाबाधित रुग्णांशी संवादही साधला. येथील सर्व व्यवस्थेबाबत यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गांधी जयंती कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांनी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांचा गौरवही केला. या परिसरात सुरू करण्यात आलेल्या विषाणू प्रयोगशाळेलाही त्यांनी भेट दिली.