ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे या सरकारमधील अनेक मंत्र्यांची झोप उडाली असून, त्यांना भाई लोकांची मदत घ्यावी लागत आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
सोमय्या आज ठाणे महापालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ठाकरे सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारी आहेत. त्यांना ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे त्यांची झोप उडाली असून, त्यांना भाई लोकांची मदत घ्यावी लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुंड धमकावत आहेत. तसेच वाशिममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला, त्यामध्ये भावना गवळी यांचे गुंड होते, तसे रिपोर्टमध्ये आले आहे. त्यामुळेच गृहमंत्रालयाकडून मला सीआयएसएफच्या 40 जवानांचे कवच असलेली झेड सुरक्षा देण्यात आली आहे.