सलग इंधन दरवाढीमुळे नागरीक त्रस्त
ऑनलाईन टीम / मुंबई
इंधनदर वाढीवरुन देशात केंद्रावर जनतेसह विरोधी पक्षांकडून टीका होत असताना यात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असे म्हणाले होते. २०१५ मधील एका रॅलीतील हा व्हिडिओ आहे. या वरुनच सोशल मिडीयावर मोदींना टार्गेट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
देशात इंधन दर वाढीवरुन जनता नाराज असाताना दिवसें – दिवस होणारी वाढ नागरिकांच्या चिंतेचा विषय बनत आहे. कारण इंधनदर वाढ झाली की जीवनावश्यक वस्तूंचे दर आपोआप वाढतात, जीवनावश्यक वस्तू महागल्या असता जनसामान्यांचे अर्थिक गणित कोलमडते. आणि यामूळे देशातील बहूतांशी घटक या महागाईत भरडला जातो.
आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते. या मुद्यावरुन मलिक यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे की आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय ?”, असा खोचक सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे .पंतप्रधान मोदींच्या नशीबाने जर पेट्रोलचे दर कमी होतात, तर मग आता पेट्रोलने शंभरी कशी गाठली याचे उत्तर नशीबवान मोदींनी द्यावे, असे मलिक यांनी म्हटले आहे.